Majha Nibandh

Educational Blog

essay on nature in Marathi

निसर्ग मराठी निबंध 2024 अतिशय सुंदर Essay on Nature in Marathi

Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi.

अश्मयुगापासून मानवाचे आणि निसर्गाचे नाते अतूट राहिले आहे. निसर्ग हा मानवाचा मित्र आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिले आहे. सजीवाच्या जगण्याचा आधार हा निसर्गच आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा सजीवासाठी गरजेच्या  असतात त्या सर्व निसर्गातूनच प्राप्त होतात, जसे अन्न, वस्त्र, निवारा, ऊन, वारा, पाऊस, औषधी वनस्पति इत्यादि.

निसर्गामध्ये तीन ऋतु आढळतात, उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा. उन्हाळा हा कडक उन्हाचा, उष्ण वातावरणाचा ऋतु असतो, हिवाळा हा थंडीचा ऋतु असतो तर पावसाळा हा मेघधारांचा, पाऊसाचा ऋतु असतो. आपल्या भारत देशात प्रत्येक ऋतु मध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात.

Essay on Nature in Marathi

मानवाला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणार्‍या गोष्टी फळे, फुले, पाने, डिंक, आणि लाकूड अश्या अनेक वस्तु निसर्गातूनच प्राप्त होतात. झाडापासून मिळणार्‍या लाकडापासून मानव स्वत:साठी घर बनवू लागला आहे तसेच फळे, फुले, पाने यांपासुन तो औषधी पेये, सौंदर्य प्रसाधने बनवू लागला आहे. आयुर्वेद शास्त्र हे पुर्णपणे निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींवर अवलंबून आहे. निसर्गातील झाडे मानवाला शुध्द ऑक्सिजन पुरवतात.

किलबिलणारे पक्षी, खळ खळ वाहणारा झरा, नदी, नाले, ओढे, उंच वृक्ष, रंगबेरंगी फुले, फळे, हिरवीगार पाने, डोंगर, दर्‍या, पर्वत, महासागर, समुद्र, सुंदर पक्षी जसे पोपट, मोर, सुतार पक्षी, गान कोकिळा हे सर्व निसर्गाचीच ओळख आहे. मानवाचे शरीर हे हवा, पाणी, अग्नी, आकाश, आणि पृथ्वी या निसर्गातील पंचमहाभूतांपासून बनले आहे.

Essay on Nature in Marathi

सजीवाच्या शारीरिक व मानसिक विकासामध्ये निसर्गातील मौल्यवान गोष्टींचा मोठा वाटा आहे. निसर्ग हा मानवाची प्रत्येक गरज पूर्ण करतो पण मानवाने स्वत:च्या अस्तित्वासाठी, व वाढत्या हव्यासापोटी जवळ जवळ निसर्ग सृष्टी नष्ट करत आणली आहे.

खाणकाम, वाळू उपसा, वृक्षतोड, प्राण्यांची हत्या, उद्योगधंद्यामुळे, मोटारी वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण, जल प्रदूषण ह्या सर्व मानवनिर्मित गोष्टीमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ लागली आहे.

Essay on Nature in Marathi

मानव निसर्गाची हानी करून स्वत:च्या पायावर स्वत:च कुर्‍हाड मारून घेऊ लागला आहे, तो हे विसरून चालला आहे की जसे आपले घर आपले घर आहे तसे निसर्ग सुद्धा आपल्या सर्वांचे घर आहे. मानवाने निसर्गातीला अनेक महत्वपूर्ण घटकांवर अनेक उद्योग धंदे उभारले आहेत.

झाडांपासून रबर निर्मिती, औषध निर्मिती, फर्निचर निर्मिती, लाकडी शोभेच्या वस्तु निर्मिती, नदीच्या समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवे वर चालणार्‍या पवन चक्की पासून वीज निर्मिती, खाणकामातून कोळसा, खनिजे निर्मिती असे अनेक महत्वपूर्ण उद्योग धंदे मानवाने निसर्गातून मिळणार्‍या कच्च्या सामग्रीवर उभारले आहेत.             

मासेमारी, पशुपालन, मातीपासून वीट निर्मिती असे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे सुद्धा निसर्गातील साधन सामग्रीवर उभारले गेले आहेत. निसर्गातील सुंदर दृश्ये मानवाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्यांमुळे जगभरात पर्यटन क्षेत्राचा खूप विकास झाला आहे.

जगभरातील अनेक निसर्गनिर्मित आश्चर्य पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करू लागला आहे त्यामुळे त्या त्या देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होऊ लागली आहे. निसर्गातील हिरवळ, रंगबेरंगी फुले, फळे, पाने आणि वेली हे मानवाचा मानसिक ताण तणाव दूर करण्यास मदत करते.

आधुनिकीकरणासाठी मानवाने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, ध्वनि प्रदूषण, वायु प्रदूषण, आणि जल प्रदूषण हे सर्व त्याचीच उदाहरणे आहेत. मानवाने स्वत:च्या सुखासाठी सोयीसाठी निसर्गाची हानी तर केलीच पण त्यामुळे इतर प्राण्यांचे जीवन सुद्धा धोक्यात आणले आहे. निसर्गातील सुंदर पक्षी, उपयोगी झाडे, उपयोगी प्राणी यांचे प्रमाण सुद्धा कमी होऊ लागले आहे.

आपले जीवन सुखकर आणि निरोगी ठेवण्यासाठी तसेच पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे, निसर्गातील साधन संपतीची जपणूक केली पाहिजे, वायुप्रदूषणास, जल प्रदूषणास, आणि ध्वनि प्रदूषणास करणीभूत वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे अन्यथा पुर्णपणे टाळला पाहिजे.

सूचना : जर तुम्हाला Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

निसर्ग माझा मित्र / सोबती मराठी निबंध | Nisarg maza sobati nibandh in marathi

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध | nisarg maza mitra marathi nibandh.

या लेखामध्ये सर्व मित्रांसाठी निसर्ग आपला सोबती (nisarg maza sobati nibandh) या विषयावर मराठी निबंध देण्यात आला आहे आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तर चला निबंधाला सुरूवात करूया. 

essay on nature my friend in marathi

निसर्ग माझा सोबती निबंध मराठी - (nisarg maza sobati nibandh in marathi)

आजच्या आधुनिक युगात मनुष्य निसर्गाला साधारण आणि तुच्छ समजत आहे. कारण निसर्ग चारही बाजूंना सहज उपलब्ध झाला आहे. आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते त्या गोष्टीची किंमत व्यक्तीला राहत नाही. परंतु खरे पाहता निसर्ग मनुष्याचा अतिशय घनिष्ट मित्र आहे व तो मनुष्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो. ज्या पद्धतीने एक खरा मित्र नेहमी, प्रत्येक संकटात आपल्या सोबत असतो त्याच पद्धतीने निसर्गही आपला सोबती आहे. 

आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार व कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक सुंदर रचना केल्या आहेत. आपल्या सभोवताली असलेले पाणी, हवा, जंगल, पर्वत, नदी, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र इत्यादी गोष्टींपासून निसर्ग बनतो. निसर्ग अनंत रंगांनी भरलेला आहे ज्याने आपल्या कुशीत सजीव निर्जीव सर्व जीवांना सामावून घेतले आहे. 

खरे पाहता निसर्ग हा आपला मित्र आहे. कारण निसर्ग हीच ती शक्ती आहे की आपल्याला विश्वात सर्वकाही देते. मग ते आपले अन्न असो वा जीवन. निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते. वृक्षांची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव कमी होतो. म्हणून जर कधीही तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर बागेत जाऊन फिरून या. बागेतील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला मानसिक शांती लाभेल. निसर्ग आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांना सहज पूर्ण करतो.

निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे. निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे. हा प्राणवायू आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन या प्राणवायू शिवाय आपण फक्त काही क्षण जीवंत राहू शकतो. मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते, व हे अन्न देखील निसर्गच उपलब्ध करून देतो. आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे. या धरतीवर बनवलेले घर सुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूं पासून बनवण्यात आले आहे. 

निसर्ग हा फक्त मनुष्याचाच मित्र नसून तो पशू व पक्ष्यांचाही घनिष्ट मित्र आहे. कारण तो मनुष्या सोबत पशू पक्ष्यांची देखील अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करीत असतो. आपल्याला निसर्गाचे संतुलन न बिघडवता याचा योग्य उपयोग करवून घ्यायला हवा. निरोगी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष्य द्यायला हवे याला स्वच्छ ठेवायला हवे. इकडे तिकडे कचरा न टाकता त्याला कचरा कुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी. 

मनुष्याने कधीही निसर्ग या मित्रांसोबत छेडछाड करायला नको. आजच्या मनुष्याला वाटते की निसर्ग त्यांच्या अनुसार चालायला हवा. परंतु असा विचार करणे मुळात फारच चुकीचे आहे. आपण मनुष्य निसर्गाच्या अनुसार जिवंत राहण्यासाठी बनलो आहोत. या निसर्गात बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. आजकाल सभवताली वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग मित्राचा ह्रास होत आहे. जल, वायु, पानी आणि मृदा प्रदूषणामुळे निसर्ग नष्ट होत आहे. याचे दुष्परिणामही मनुष्याला भोगावे लागत आहेत. 

निसर्ग संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै ला विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरात निसर्ग संवर्धन आणि निसर्गाचे महत्व या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात येतात. या दिवशी जगभरातील लोक निसर्ग सोबतींचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात. आज आपणही संकल्प करायला हवा की निसर्गाला संरक्षित करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन प्रयत्न करूया. 

पर्यावरण संवर्धन काळाची गरज वाचा येथे 

तर मित्रांनो हा होता  nature is our friend essay in marathi अर्थात  निसर्ग आपला सोबती या विषयावरील मराठी निबंध. आशा करतो की निबंध तुम्हाला आवडला असेल या निबंधाला इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा.  

  • झाडाची आत्मकथा 
  • प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध 
  • झाडे लव झाडे जगवा मराठी निबंध 

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi

मित्रांनो, आज आपण माझा मित्र निबंध मराठी मध्ये लिहिला आहे. माझा आवडता मित्र निबंध इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या निबंधाच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या जिवलग मित्रावर चांगला निबंध लिहू शकतात जेणेकरून ते परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतील. हा माझा जिवलग मित्र मराठी निबंध आम्ही सोप्या भाषेत लिहिला आहे.

माझा मित्र-my best friend

माझा मित्र निबंध मराठी – My Best Friend Essay in Marathi

Table of Contents

माझा मित्र निबंध मराठी Set 1 – My Best Friend Essay in Marathi Set 1

माझ्या वर्गमित्राचे नाव सुनील आहे. आम्ही दोघे एकाच वर्गात आहोत व एकाच बाकावर बसतो. आमची घरेसुद्धा जवळ जवळ आहेत. आम्ही पहिलीच्या वर्गापासून मित्र आहोत.

सुनील स्वभावाने फार मनमिळाऊ आहे. तो अभ्यासात फार हुशार आहे. तो खेळातही खूप मन लावतो. तो आमच्या वर्गाचा मॉनिटर आहे. सगळी मुले त्याला खूप मानतात. सगळ्या शिक्षकांना तो खूप आवडतो. सुनील मला अभ्यासात मदत करतो. मी आजारी पडलो तर तो माझ्या घरी खूप वेळ माझ्याकडे थांबतो व विचारपूस करतो.

सुनील फारच चांगला मुलगा आहे. तो आपल्या आई-वडिलांचा मान ठेवतो. आपल्या भाऊ-बहिणीवर खूप प्रेम करतो. तो कधीही कोणाशीही भांडत नाही. ह्या सर्व कारणांमुळे मी सुनीलवर फार प्रेम करतो. सुनीलसारखा मित्र मिळाला म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो.

[printfriendly current=’yes’]

माझा आवडता मित्र निबंध मराठी–My Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध मराठी Set 2 – My Best Friend Essay in Marathi Set 2

माझ्या मित्राचे नाव राजस आहे. तो माझ्या वर्गात आहे आणि माझ्याच इमारतीत राहातो. त्यामुळे आम्ही दोघे कायम एकत्रच असतो. शाळेत एकत्र जातो आणि एकत्रच परत येतो त्यामुळे आम्हाला ‘एकमेकांचे शेपूट’ असे चिडवतात.

शाळेत त्याचा नंबर नेहमी पहिला असतो आणि माझा मात्र दहावा असतो पण तरी तो भाव खात नाही आणि माझ्याशी बोलताना गर्विष्ठपणा करीत नाही.

माझी आई कधीकधी मला म्हणते की तो बघ किती हुशार आहे, नाही तर तू! तेव्हा मात्र मला आईचा राग येतो. बाबाही तिला म्हणतात की दोन मुलांची तुलना कधीही करू नये.

राजसचे आईबाबा दुबईत असतात. तो इथे आजीसोबत राहातो त्यामुळे त्याला आमच्या घरी यायला खूप आवडते.

आम्ही दोघे मिळून गच्चीवर पतंग उडवतो, सोसायटीत क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन सुद्धा खेळतो.

त्याचे आईबाबा दुबईहून दर मे महिन्यात येतात तर तो दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्याकडे जातो. तो नसला की मला करमत नाही. पण ह्या वर्षी दिवाळीत मी राजसबरोबर दुबईला जाणार आहे, त्यासाठी माझ्या बाबांनी मला पासपोर्ट काढून दिला आहे.

एवढा चांगला मित्र मला मिळाला हे माझे केवढे भाग्य आहे.

माझा मित्र निबंध मराठी–My Best Friend Essay in Marathi

माझा आवडता मित्र Set 3 – My Friend Essay in Marathi Set 3

[मुद्दे : नाव – शेजारी राहतो- एका वर्गात – खेळणे, अभ्यास करणे एकत्र – गायनस्पर्धेत सहभाग – हुशार, चांगला स्वभाव – सुंदर हस्ताक्षरवया नीटनेटक्या – सर्वांना आवडणारा – मला अभिमान वाटतो.]

माझ्या मित्राचे नाव विनय आहे. तो माझा सर्वांत आवडता मित्र आहे. तो लहानपणापासून माझा मित्र आहे. त्याचे घर आमच्या शेजारीच आहे.

विनय आणि मी एकाच वर्गात आहोत. आम्ही एकाच बाकावर बसतो. संध्याकाळी घरी आल्यावर एकत्र खेळतो आणि अभ्यासही एकत्र करतो. विनयचा आवाज चांगला आहे. तो नेहमी गायनस्पर्धेत भाग घेतो.

विनय हुशार मुलगा आहे. तो स्वभावानेही खूप चांगला आहे. “नेहमी विनयच्या संगतीत राहा,” असे माझी आई मला सांगते. त्याच्या वया, नीटनेटक्या व सुंदर असतात. सगळेजण अभ्यास करण्यासाठी त्याच्या वयांचाच उपयोग करतात. विनय वर्गातील सर्वांना खूप आवडतो. मला या माझ्या मित्राचा अभिमान वाटतो.

माझा आवडता मित्र Set 4 – My Friend Essay in Marathi Set 4

[मुद्दे : अनमोल मित्र – लहानपणापासून मैत्री – सुंदर हस्ताक्षर अप्रतिम चित्रकला – मित्राच्या यशाने आनंदी होणारा – अबोल पण मनाने मोठा – आवडता मित्र.]

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्या प्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

माझा जिवलग मित्र मराठी निबंध Set 5 – Essay On My Best Friend in Marathi Set 5

माझा मित्र माझ्याच वर्गात शिकतो. त्याचे नाव गोविंद आहे.

त्याचे घर आमच्या घराशेजारीच आहे. आम्ही दोघे शाळेत बरोबरच जातो. वर्गात शेजारीच बसतो. तो खूप हुशार आहे. आमच्या बाई नेहमी सर्वांना ‘गोविंद सारखे वागा’ असे सांगतात. कारण गोविंद अभ्यासात हुशार आहे. खेळण्यातही तो पटाईत व चपळ आहे.

तो सर्वांना मदत करायला नेहमी तयार असतो. त्याला चित्रकला व हस्तकलाही आवडते. आम्ही दोघे एकत्रच चित्रकला शिकायला जातो. तो माझ्या वाढदिवसाला स्वतः वस्तू बनवून भेट देतो. आम्ही दोघे एकमेकांना सतत मदत करीत असतो.

तो शांत स्वभावाचा आहे. मी काही म्हटले तरी तो कधीच विरोध करीत नाही. पटले नाही तर फक्त हसतो. खरेच, आमची मैत्री सुदामा व कृष्णाप्रमाणेच आहे.

माझा प्रिय मित्र मराठी निबंध Set 6 – Majha Mitra Nibandh in Marathi Set 6

चांगला मित्र मिळणे ही कठीण गोष्ट आहे. आजच्या काळात जिथे सर्वत्र स्वार्थी लोकांची गर्दी ओह. त्या गर्दीत एकदा निःस्वार्थी मित्र भेटणे म्हणजे वरदान असल्यासारखेच आहे. याबाबतीत मी फार सुदैवी आहे. मला तीन चार मित्र आहे. परंतु त्यापैकी एक आहे माझा प्रिय मित्र रमण. तो तसा आहे चैन्नईचा राहाणारा. पण तो मागच्या काही दिवसापासून दिल्लीतच रहातोय. त्याचे वडील एक वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. आई घराकाम पहाते.

रमण आणि मी एकाच वर्गात आहोत आणि वर्गात एकाच डेस्कवर बसतो. तो नवरोजी नगरात रहातो. मी आर.के. पुरम येथे. . एकमेकापासून जास्त दूर नाही हे अंतर एकमेकांच्या घरी जाणे-येणे तर असतेच. त्याचे आई-वडील आम्हा दोघात कसलाही भेदभाव करीत नाहीत. माझे आई-वडील देखील आमच्यात कसलाही फरक करीत नाही.

रमण एक हुशार विद्यार्थी आहे. वर्गात नेहमी प्रथम येतो. त्यांचे पाठांतर तर कमालीचे आहे, परंतु त्याला त्याचा थोडाही अभिमान नाही. वाचायला-लिहायला तो मला नेहमीच मदत करतो. त्याला आणि मला दोघांनाही बागकाम करण्याचा छंद आहे. आम्ही दोघे या विषयावर सदान्कदा गापा मारतो आणि रोपाचे प्रदर्शन पहायला जातो. माझ्या घराच्या मागे एक आमचे स्वतःचे गार्डन आहे. त्याला पाणि घालणे, देखभाल करण्यात आम्ही आमचा वेळ घालवतो.

माझा मित्र/मैत्रीण मराठी निबंध Set 7 – Majha Mitra Essay in Marathi Set 7

‘दिये जलते हैं, फूल खिलतें हैं, बडी मुश्किलसे मगर दुनिया में दोस्त मिलतें है.” असे एक गाणे आहे. किती खरं लिहिलं आहे त्यात ! ह्या जगात जीवाला जीव देणारे मित्र मिळणे खूप कठीण आहे. नातेवाईक आपल्याला आपोआपच मिळतात. त्यात आपल्याला निवडीची संधीच नसते. परंतु मित्रांचे तसे नाही. आपल्या स्वभावाशी जुळणा-या मुलांशी आणि मुलींशी आपली मैत्री होते.

खरा भित्र कसा असावा? ख-या मित्राने नेहमी आपल्याशी विश्वासाने वागावे. आपल्या मनातले त्याला सांगता यावे आणि त्यानेही ते ऐकून घ्यावे. त्याच्याबरोबर आपल्याला खेळता बागडता यावे. आपल्याला त्रास झाला तर त्याच्या डोळ्यात पाणी यावे. पण मला वाटते की त्यासाठी आपण स्वतःच एक चांगला मित्र बनले पाहिजे. आपण आपल्या मित्राच्या अडीअडचणीला धावून गेलो तर त्यालाही आपल्याबद्दल तसेच वाटणार ना? म्हणून दुस-याकडून आपण मैत्रीची जी अपेक्षा करतो तसे अगोदर आपल्याला वागता यायला हवे.

माझा मित्र सुबोध मला खूप आवडतो. तो आणि मी जवळजवळ राहात असल्यामुळे शाळेत आम्ही एकत्रच येतो. बाकावरही एकाच बसतो. स्वभाव जुळले की सहवासाने मैत्री नक्कीच वाढते. तसे आमचे झाले आहे. आम्ही दोघे वर्गात खूप बडबड करतो म्हणून कधीकधी आमचे शिक्षक आम्हाला दूर बसण्याची शिक्षा देतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आम्ही ह्यापुढे बडबड करणार नाही पण आम्हाला एकत्र बसवा. तसे आम्ही चारपाच दिवस वागतो. नंतर पुन्हा विसरतो आणि ओरडा खातो ती गोष्ट वेगळी.

मध्यंतरी सुबोधला डेंग्यू झाला होता तेव्हा मी रोज त्याच्या घरी जाऊन काय काय अभ्यास झाला ते त्याला सांगत होतो आणि त्याला गोष्टीसुद्धा वाचून दाखवत होतो. त्यामुळे त्याला आणि मला दोघांनाही बरे वाटत होते.

ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दोघे पोहण्याच्या शिबिराला जाणार आहोत. असा आहे माझा मित्र.

माझा आवडता निबंध Set 8 – My Best Friend Essay in Marathi Language Set 8

‘अमित्रस्य कुतः सुखम् ।’ असे एक सुभाषितकार म्हणतो. मैत्रिशिवाय या जगात सुख मिळणार नाही. आपल्या भावना मोकळेपणी व्यक्त करण्याचे एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे आपल्या मित्राजवळ.

मला अनेक मित्र आहेत. शाळेतले मित्र, मैदानावरचे मित्र, माझ्या भावाचे मित्रहीं माझे मित्रच आहेत. पण या सगळ्यांमध्ये माझ्या जिवाभावाचा जो मित्र आहे, त्याचे नाव आहे मकरंद. तो माझ्याच वर्गात आहे. तो माझ्याच शेजारी बसतो. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही अभ्यासातही एकमेकांना खूप मदत करतो. खूप खेळतो, मस्ती करतो, एकत्र डबा खातो आणि शाळा सुटली, की जड मनाने एकमेकांचा निरोप घेतो. मकरंद एक दिवस जरी शाळेत आला नाही, तरी मला करमत नाही. राहून राहून त्याची आठवण येते. तो मधल्या सुट्टीत तरी यावा, असे वाटत राहते.

मकरंद खूप हुशार आहे. अभ्यासू आहे. त्याच्यामुळे मलाही अभ्यासाची खूप गोडी लागली आहे. त्याचा अभ्यास नेहमी वेळेवर पूर्ण असतो. परीक्षेपूर्वी त्याची प्रत्येक विषयाची व्यवस्थित उजळणी झालेली असते. तीच शिस्त आता मला लागली आहे.

अभ्यासाबरोबर मकरंद खेळातही खूप तरबेज आहे. तो फुटबॉल खूप छान खेळतो. आमच्या शालेय संघाचा तो ‘गोलकीपर’ आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे आमचा संघ अनेकवेळा आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा जिंकलेला आहे. मला त्याच्या ह्या सर्व गुणांचे खूप कौतुक वाटते. तो परिश्रमपूर्वक एखादी गोष्ट शिकून घेतो. सर्वांशी मनमोकळा राहून मदत करतो, शिक्षकांचा आदर करतो. वर्गातील कच्च्या मुलांचा कधीकधी मधल्या सुट्टीत अभ्यास करून घेतो.

मकरंदचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत. त्यांची नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते. त्यांनी सुट्टीत मकरंदसाठी आणलेला खाऊ तो नेहमी शाळेत आणून आम्हा सर्व मुलांना वाटतो.

असा हा सर्वगुणसंपन्न असलेला माझा मित्र मकरंद मलाच काय, सगळ्यांनाच आवडतो. सगळ्यांना मकरंदसारखा आधार देणारा मित्र मिळावा, असे मला वाटते.

माझा जिवलग मित्र मराठी निबंध Set 9 – Essay On My Best Friend in Marathi Set 9

इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते. मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.

माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.

अशोकची उंची ४.५” आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे. शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे.

तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी हातो. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.

मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

माझा मित्र मराठी निबंध Set 10 – My Best Friend Essay Marathi Set 10

परवाच माझे रोहनशी जोरदार भांडण झाले. रोहन हा माझा अगदी बालवर्गापासूनचा मित्र. तो माझ्याच इमारतीत तळमजल्यावर राहातो. त्यामुळे आम्ही अगदी सकाळ संध्याकाळ एकत्र असतो असे म्हणायला हरकत नाही. भांडण करायला कारण तसे किरकोळच होते. कुठला खेळ खेळायचा ह्यावरून आम्ही भांडलो आणि शेवटी न खेळताच घरी परत गेलो. दुस-या दिवशी मला चुकल्याचुकल्यासारखे होत होते कारण रोहनशी बोलता येत नव्हते. भांडण झाले होते ना? शेवटी माझी घालमेल चाललेली आजीला कळली. तिने रोहनला बोलावून घेतले तोही जणू काही आजीच्या बोलावण्याची वाटच बघत असल्यासारखा आला. मग काय? आम्ही गेलो ना आमचे भांडण विसरून! मैत्री ही अशी असते. मित्र हा असा असतो.

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. ज्याच्याशी तो आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकेल असा कुणी ना कुणी सोबती त्याला ह्या जगात हवा असतोच. जो मित्र आपल्या जीवाला जीव देतो, सुखदुःखात साथ देतो, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो, अडचणीच्या वेळेस धावून येतो तोच आपला खरा मित्र असतो. आपले चुकत असले तर वेळप्रसंगी तो आपली कानउघाडणीही करतो. अशा वेळी त्याचा हेतू चांगलाच असतो, ते आपण समजून घेतले पाहिजे. शिवाय आपल्याला जर चांगला मित्र हवा असेल तर आपण स्वतः तसे अगोदर बनले पाहिजे.

संस्कृतमध्ये सूर्याला मित्र असेही नाव आहे. खरोखरच सूर्य हा ह्या सृष्टीचा मित्रच आहे. सूर्य नसेल तर ही सृष्टीच उरणार नाही. त्यामुळे सूर्याचे हे नाव अगदी समर्पक वाटते.

चांगल्या मित्रांच्या जोड्या ह्या जगात पुष्कळ होऊन गेल्या. कृष्णसुदाम्याची कहाणी आपल्याला माहिती आहेच. कृष्ण राजा झाला, मोठा माणूस झाला परंतु तो लहानपणीच्या आपल्या मित्राला विसरला नाही. त्याची गरीब परिस्थिती त्याने जाणून घेतली आणि आपल्या मित्राचा स्वाभिमान न दुखवता त्याने त्याला मदत केली. कर्ण आणि दुर्योधनाची मैत्रीही आपल्याला माहिती आहे. कर्णाच्या वाईट काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. त्याला राजेपद दिले. ते कर्ण कधीही विसरू शकला नाही. ‘तू कुंतीचा मोठा मुलगा आहेस, तेव्हा तू पांडवांच्या बाजूने ये’ असे खुद्द कृष्णाने सांगूनही कर्णाने आपल्या मित्राला धोका दिला नाही.

खरा मित्र मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट असते. सर्वांना खरा मित्र मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तसा मित्र मिळाला असेल तर तुम्ही देवाचे आभार माना आणि तुम्हीही त्याचे खरे मित्र बना.

माझा मित्र निबंध मराठी Set 11 – My Best Friend Essay in Marathi Set 11

माझा मित्र निबंध प्रस्तावना.

आपल्या सर्वांचे अनेक मित्र असतात, पण खऱ्या आणि चांगल्या मित्राची आयुष्यात प्रत्येकाला गरज असते. आपला खरा मित्र कोणता हे ओळखणे थोडे अवघड आहे. पण काळाच्या ओघात आपला सर्वात चांगला मित्र कोण आहे हे आपल्यालाच कळते.

बर्‍याच वेळा अनेकजण मवाळ बोलून आपली दिशाभूल करतात आणि हा आपला प्रिय मित्र आहे असे आपल्याला वाटू लागते. पण असे लोक कधीच चांगले मित्र बनत नाहीत आणि काम झाल्यावर ते आपल्यापासून अंतर ठेवतात.

एक चांगला मित्र कधीच असे करत नाही, परंतु जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो आपल्याला मदत करतो आणि वास्तविकतेची ओळख करून देतो.

माझा आवडता मित्र

माझ्या प्रिय मित्राचे नाव रवी आहे. तो माझ्या शाळेत माझ्यासोबत शिकतो. माझ्यासोबत लहानपणापासून शाळेत शिकणारे माझे अनेक मित्र आहेत, पण त्या सर्वांशी माझी मैत्री 3 वर्षात रवीशी झाली तेवढी घट्ट होऊ शकली नाही. या तीन वर्षांत अशा अनेक घटना घडल्या की रवी माझा खरा मित्र असल्याची जाणीव झाली.

असा चांगला मित्र मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. चांगल्या मित्रामध्ये असायला हवेत असे सर्व गुण त्याच्यात आहेत. आम्ही दोघेही प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना साथ देतो. आमची मैत्री आयुष्यभर अशीच राहील याची मला खात्री आहे.

माझ्या आवडत्या मित्राची वैशिष्ट्ये

रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असला तरी त्याचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. तो मृदू बोलतो आणि मोठ्यांचा आदर करतो. तो अभ्यासात माझ्यापेक्षा खूप चांगला आहे आणि खेळातही रस घेतो.

तो सर्वांशी आत्मविश्वासाने बोलतो आणि सर्वांशी चांगले वागतो. आम्ही दोघे एकत्र बसून गप्पा मारतो तेव्हा आम्हाला वेळही कळत नाही. त्याला कथा आणि कविता लिहिण्याची आवड आहे आणि मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमते.

जेंव्हा तो नवीन कथा किंवा कविता लिहितो तेंव्हा तो मला सर्वात आधी सांगतो. आमच्या मैत्रीवर त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत, ज्या मला खूप आवडतात. तो खूप छान माणूस आहे आणि सर्वांना मदत करतो.

आमच्या शाळेत जेव्हा जेव्हा स्काउटिंगची कामे दिली जातात, किंवा समाजसेवेचे काम करण्यास सांगितले जाते तेव्हा तो सर्वात पुढे असतो. तो खरा आहे आणि माझ्या माहितीनुसार मी त्याला कधीही खोटे बोललेले पाहिले नाही.

एखाद्याला कडू वाटले तरी तो स्वतः चांगला होण्यासाठी खोट्याचा अवलंब करत नाही. खऱ्या मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवतो.

जेव्हा जेव्हा मी एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळतो तेव्हा मी त्याला फक्त सांगतो आणि तो मला योग्य सल्ला देतो. त्याच्यात अनेक गुण आहेत जे मला कालांतराने कळत गेले आणि आमची मैत्रीही घट्ट होत गेली.

माझा मित्राबद्दल काही घटना

माझे अनेक मित्र आहेत पण त्यांच्यात रवी कसा खास झाला याचा विचार केल्यावर मला अनेक गोष्टी आठवतात. त्यातील एक म्हणजे जेव्हा त्याने मला साथ दिली आणि खऱ्या मित्राचे कर्तव्य पार पाडले.

मी दहावीत असताना रवीने आमच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळेस मी माझ्या किशोरवयात अभ्यासाबाबत थोडा बेफिकीर झालो होतो आणि मला सर्व काही माहित आहे असे वाटायचे.

शिक्षक वर्गात शिकवायचे तेव्हा मी लक्ष देत नसे. परिणामी सहामाही परीक्षेत मी दोन विषयांत नापास झालो. त्यावेळी रवीने मला समजावून सांगितले आणि मन लावून अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.

मला जेव्हा जेव्हा अभ्यासात काही अडचण येत असे तेव्हा तो माझ्या घरी यायचा आणि मला अभ्यासात मदत करायचे, त्यामुळे मी दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. एकदा आमच्या शाळेत स्पोर्ट्स फंक्शन आयोजित करण्यात आले होते आणि आम्ही दोघेही त्यात सहभागी झालो होतो.

आम्हाला कबड्डीची आवड होती म्हणून आम्ही त्या खेळात भाग घेतला. आमच्या शाळेत वेगवेगळ्या शाळांचे संघ आले. त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा स्वभाव खूप मत्सरी होता, त्यामुळे कबड्डीच्या खेळादरम्यान त्यांनी मला पकडले आणि धक्काबुक्की केली.

त्यामुळे माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रवीने माझी काळजी घेतली आणि शिक्षकांच्या मदतीने मला रुग्णालयात नेले. तसेच अशा वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली.

मग रवी अनेकदा माझ्या घरी यायचा आणि जोपर्यंत मला डॉक्टरांनी शाळेत जायला मनाई केली होती तोपर्यंत तो मला शाळेत शिकवले जाणारे सर्व महत्त्वाचे विषय समजावून सांगत असे. अशा प्रकारे या तीन वर्षांत अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे आमचे नाते अधिक घट्ट होत गेले.

आमची मैत्री श्रीमंत गरिबीच्या पलीकडे आहे

माझा मित्र रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे त्याला पैशाचे महत्त्व चांगले समजते आणि तो उधळपट्टी करत नाही. याउलट मी श्रीमंत कुटुंबातून आलो आहे आणि त्याला भेटेपर्यंत खूप उधळपट्टी करायचो.

अनेक वेळा मी माझ्या वर्गमित्रांसह पार्ट्या करायचो आणि महागड्या वस्तू खरेदी करायचो. पण जेव्हा मी रवीशी मैत्री केली तेव्हा त्याने मला समजावून सांगितले की पैसे मिळवणे खूप कठीण आहे आणि आमचे पालक खूप कष्ट करून पैसे कमवतात, त्यामुळे आपण ते वाया घालवू नये.

इतर सर्व मित्रांप्रमाणे, त्याने मला महागड्या भेटवस्तू देण्यास नकार दिला आणि सांगितले की जर तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तर तुम्ही ते जमा करा किंवा त्यांच्याकडून कोणत्याही गरीब असहायांना मदत करा.

त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि मला समजले की श्रीमंती आणि गरिबीचा मैत्रीच्या नात्यावर परिणाम होत नाही. त्याच्यासाठी एकमेकांबद्दल फक्त अस्सल भावना असणे पुरेसे आहे.

अशी होती कृष्ण आणि सुदामाची मैत्री, संपत्तीची भिंत त्यांच्या वाटेला कधीच आली नाही. आता आम्ही दोघेही आमच्या वाढदिवशी आमच्या श्रद्धेनुसार गरजूंना मदत करतो, ज्यामुळे आम्हाला अपार शांती आणि आनंद मिळतो.

माझा विश्वासू मित्र

माझा प्रिय मित्र रवीवर माझा खूप विश्वास आहे आणि मी त्याला काहीही संकोच न करता सर्व काही सांगू शकतो. खर्‍या मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुमची गुपिते सर्वांसमोर उघड करत नाही आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मित्राबद्दल काही गोष्टी सांगू शकत नाही, तर तो नक्कीच तुमचा खरा मित्र नाही. त्यामुळे ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यालाच सर्व गोष्टी सांगाव्यात.

मी रवीला अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या मला इतर लोकांसोबत शेअर करायच्या नव्हत्या आणि त्याने माझे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि कोणालाही सांगून माझी चेष्टा केली नाही, जे बहुतेक लोक करतात.

माझा मित्र योग्य सल्लागार

चांगला मित्र तोच असतो जो तुम्हाला योग्य सल्ला देतो आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो. आयुष्यात अशी अनेक माणसे भेटतात जी आपल्याला आपापल्या परीने समजावून सांगतात.काही लोक चांगले सल्ले देतात तर काही दुसऱ्याच्या त्रासातही आपला स्वार्थ सिद्ध करण्यात व्यस्त असतात आणि त्यामुळे सर्वांची दिशाभूल करतात.

त्यामुळे जेव्हा-जेव्हा मला असे वाटले की या परिस्थितीत काय करावे हे समजत नाही, तेव्हा मी माझे पालक आणि माझा मित्र रवी यांचा सल्ला घेतला आहे. कारण त्याने मला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे.

माझ्या चांगल्या कृत्यांबद्दल त्यांनी मला प्रोत्साहन दिले, माझी प्रशंसा केली आणि मला कोणतीही चूक न करण्याची ताकीद दिली. त्यांनी मला माझी चूक मान्य करायला शिकवले आणि सांगितले की आपण सर्व मानव आहोत आणि आपण चुका करू शकतो, परंतु आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे आणि भविष्यात असे न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा जेव्हा माझे मन उदास असते किंवा मनःस्थिती खराब असते तेव्हा ते चुटकीतील जादूप्रमाणे माझा मूड ठीक करते. तो माझ्या प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती आहे आणि माझ्या स्वाभिमानाचा आदर करतो.

मी त्याच्या सत्यता आणि प्रामाणिकपणाने खूप प्रेरित झालो आहे. आपण जे काही काम करतो किंवा करण्याचा विचार करतो, त्याची योजना आपण मिळून बनवतो. आम्हाला आमची सुट्टी एकत्र घालवायला आणि एकत्र फिरायला जायला आवडते. उपसंहार

असा खरा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण एखाद्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी यावे आणि आपल्याला कधीही चांगला मित्र मिळाला तर आपण त्याची बाजू सोडून त्याचा आदर करू नये, कारण जीवनात चांगला मित्र असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला भावनिक आधार मिळेल आणि आपण योग्य मार्गावर चालता.

निष्कर्ष – माझा मित्र निबंध मराठी

असा खरा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण एखाद्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी यावे आणि आपल्याला कधीही चांगला मित्र मिळाला तर आपण त्याचा आदर करावा, कारण जीवनात चांगला मित्र असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला भावनिक आधार मिळेल आणि आपण योग्य मार्गावर चालता.

  • माझी बहिण निबंध
  • माझी बहीण निबंध 10 ओळी
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मरा ठी
  • दिवाळी सणाची माहिती मराठीत
  • दिवाळी निबंध मराठी
  • दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बाबा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध 10 ओळी  

प्रश्न १. मी माझ्या मित्राबद्दल निबंध कसा लिहू शकतो?

उत्तर- प्रास्ताविक परिच्छेदामध्ये वाचकांना आकर्षित करण्यासाठी एक आकर्षक सुरुवातीचे वाक्य समाविष्ट करा, विषयाची लगेच ओळख करून द्या आणि प्रबंध विधान करा. तुमचा प्रबंध या प्रकरणात, तुमचा मित्र चांगला मित्र आहे. मुख्य परिच्छेद लिहा. तुमचा मित्र चांगला मित्र का आहे याचे वर्णन करा आणि स्पष्ट करा.

प्रश्न २. खरा मित्र निबंध म्हणजे काय?

उत्तर- मित्रांशिवाय कोणीही करू शकत नाही, जीवन सोपे करण्यासाठी आपल्याकडे काही मित्र असले पाहिजेत. मात्र, भाग्यवान तेच असतात ज्यांना आयुष्यात खरी मैत्री मिळते. खरी मैत्री ती असते, जेव्हा एखादी व्यक्ती वाईट आणि चांगल्या प्रसंगात तुमच्यासोबत असते.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

Essay on Friendship in Marathi – My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे ज्यामध्ये कोणतीही वयोमर्यादा, रंगरूप, जातिभेद, उच्च-नीच‌ पाळलं जात नाही. मैत्रीच वर्तुळ फार मोठं आहे आणि त्याला कोणतीही रेषा नाही आहे. मैत्री एक असं नात आहे जे आपल्या सर्वांचे आयुष्य अधिक सुंदर बनवत. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अशी एक तरी मैत्रिण किंवा मित्र असतो ज्याच्या सोबत आपली फार घट्ट अशी मैत्री असते. म्हणजे जिथे आपल्याला आपल्या मैत्रिणी बद्दल किंवा मित्राबद्दल फार प्रेम आपुलकी वाटते आणि सहज आपली मैत्री अशा व्यक्तीशी होते.

ज्यांच्या आवडीनिवडी आपल्या आवडीनिवडीशी मिळत्याजुळत्या असतात. मैत्री एक अस नात आहे जे आपल्या सर्वांनाच हवंहवंसं वाटत असतं. ते लोकं फारच भाग्यवान आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारे व विश्वासू मित्र मैत्रिणी आहेत.‌ मैत्री आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.

मैत्रीमुळे आपले आयुष्य अधिक सुखी आणि आनंददायी बनतं. अगदी लहानपणापासूनच आपले वेगवेगळे मित्र-मैत्रिणी बनत जातात काहीं सोबत आपल अगदी घट्ट असं नातं तयार होतं परंतु तेच आपले खरे मित्र असतात जे अगदी शेवट पर्यंत आपल्या आयुष्यात टिकून राहतात. मैत्री हे एक असं नातं आहे जे आपल्या सुखा मध्ये सहभागी होतं आणि आपल्या दुःखामध्ये आपला आधार बनतं.

essay on friendship in marathi

मैत्री वर निबंध मराठी – Essay on Friendship in Marathi

My best friend essay in marathi.

एक घट्ट मैत्री म्हणजे सोबत हसणं, खेळणं, आपल्या मनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होणे, याला खरी मैत्री बोलतात. मैत्रीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगायला मिळतात मैत्री आपल्याला जगायला शिकवते मैत्रीमुळे आपली स्वतःशीच एक वेगळी ओळख होते.

मैत्री आपल्यातील कलागुण कौशल्याची आपल्याला जाणीव करून देते. मैत्रीमुळे आपण मानसिक दृष्ट्या  तंदुरुस्त आणि सकारात्मक राहतो.‌ आपल्या आयुष्यामध्ये अशी अधिक लोक आहेत ज्यांना आपण आपले मित्र म्हणून बोलावतो परंतु आपण आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशीच शेअर करतो जे आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो.

आपलं मैत्रीचं वर्तुळ कितीही मोठं असलं तरीही आपल्याला माहित असतं की आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आपल्या हाकेला कोण धावून येईल ते, कारण आपला त्या व्यक्तीवरती विश्वास असतो आपली त्याच्या सोबत असलेली मैत्री हा विश्वास घडवते. शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपले अनेक मित्र मैत्रिणी बनतात परंतु आपला खरा मित्र तोच असतो जो अगदी शेवटपर्यंत त्या प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देतो.

मैत्री ही दोन प्रकारची असते आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे मित्र असतात एक चांगले मित्र आणि दुसरे म्हणजे खरे मित्र. खरे मित्र हेच असतात ज्यांचा आपल्याशी आपुलकीचं, प्रेमाच एक विशेष असं नातं जोडलेलं असतं. त्यांच्यावरती आपण दीर्घकाळ विश्वास ठेवू शकतो आणि आपल्याला माहीत असते की पुढे जाऊन हे मित्र आपल्याला नेहमी साथ देतील.

खरा मित्र आपला आयुष्य अधिक सोप्प आणि आनंददायी बनवतो खरा मित्र आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र आपल्याला योग्य ते उपदेश देऊन योग्य ती मदत करतो. खरी मैत्री आपल्याला परिपूर्ण बनवते. खऱ्या मैत्रीमध्ये आपण एकमेकांना योग्य ते मार्गदर्शन करतो. मैत्रीच नात हे कुठल्याही मर्यादा पलीकडे जाऊन जपलं जातं.

  • नक्की वाचा: मैत्रीदिनावर शुभेच्छा संदेश 

मैत्री हे एक असं नात आहे जे आपण हृदयापासून जगतो, निभावतो. प्रेम, त्याग, काळजी, आपुलकी हे सगळं मैत्री या गोड नात्या मध्ये पहायला मिळतं. मैत्रीमध्ये एक एकमेकांवर वर हक्काने रागवायचं, रुसायचं, एकमेकाच्या खोड्या काढायच्या, अगदी हक्काने आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगायची आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करत अगदी घट्ट विश्वास ठेवणं म्हणजे मैत्री होय. मैत्री कुणाशीही असू शकते.

मैत्री हा असा विषय आहे ज्यावर बोलण्यासाठी लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील मैत्री एक भावना आहे जी शब्दांमध्ये उतरवणं अशक्य आहे. जर आयुष्यामध्ये मैत्री नसेल तर आपल आयुष्य व्यर्थ आहे. कारण आपल्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचे काम मैत्री करते मैत्रीमुळे आपण जगायला शिकतो.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे नात आपण अगदी हृदयाने जपतो ते म्हणजे मैत्रीचं नातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी येतच असतात तरीही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री बदलत जाते. परंतु अगदी लहानपणापासुन ते अगदी आपल्या मरणा पर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्यासोबत असेल तर ती खरी मैत्री असते.

संपूर्ण जगभरात मैत्रीचे नात सुंदर मानलं जातं. मैत्रीचं नातं सुंदर विशेष आणि खास मानलं जात म्हणूनच संपूर्ण जगभरात मैत्रीचा एक स्वतंत्र खास दिवस देखील साजरा केला जातो. त्याला फ्रेंडशिप डे असं म्हणतात भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हफ्त्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण आपल्या आवडत्या मित्र मैत्रिणीला वेगवेगळ्या भेटवस्तू भेट म्हणून देतो ग्रीटिंग कार्ड देतो. इतकच नव्हे तर या दिवशी मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकवण्याचा वचन देखील दिलं जातं. फ्रेंडशिप डे हा दिवस इतर सणां सारखा साजरा केला जातो. मैत्रीच नात हे खूप वेगळ असत जरी आपले बरेच मित्रमैत्रिणी आपल्यासोबत नसले तरी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण त्यांची आठवण नेहमीच काढतो आपण त्यांच्यापासून कितीही दूर असलो तरी मैत्रीचं नातं हे कायम तसच राहत.

मैत्रीचं नातं हे वर्तुळा सारख असतं ज्याला शेवट कधीच नसतो. मैत्री ही दिव्यातल्या पणती सारखी असते जी अंधारामध्ये पण प्रकाश देते. आपल्या मनात असणारे प्रश्न अडचणी, मनात असणार ओझ हलका करण्याची जागा म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे जिथे आपण आपल्या मनापेक्षा समोरच्या व्यक्तीचा खूप जास्त विचार करतो समोरच्याचं मनं जपण्याचा प्रयत्न करतो.

मैत्री ही पाण्यासारखी अगदी शुभ्र आणि निर्मळ असते. मैत्री ही ओळखीच्या व्यक्तींशी होते असं नाही आपल्या नकळत आपण अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करतो. आपण जन्माला येतो तेव्हा सगळी नाती आधीच आपल्या पदरात पडतात परंतु मैत्रीचं नातं हे एक असं नात असतं जे आपण स्वतः निवडतो.

शेवटी ती ईश्वराची लीला अगाध आहे न जाणे कुठून देव आपल्याला अनोळख्या व्यक्तीशी नात जुळवून देतो अनोळख्या व्यक्तींना आपल्या मनात हृदयात स्थान देतो ज्यांना कधी आपण ओळखतही नसतो अशा व्यक्तीशी आपली अगदी घट्ट मैत्री होऊन बसते. आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी मित्र-मैत्रिणी बनवतो ती अगदी साधारण गोष्ट आहे.

परंतु एकाच व्यक्ती सोबत आपण आयुष्यभर मैत्री निभावतो एकाच व्यक्ती बरोबर मैत्री टिकवून ठेवणे ही असामान्य गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक येत राहतात त्यातील काहींशी आपली चांगली मैत्री होते काही आपल्याला सोडून जातात काही सोडून गेलेली पुन्हा येतात पण काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत राहतात यालाच खरी मैत्री म्हणतात.

रक्ताची नाती आपल्याला जन्मता मिळतात परंतु मनाने जोडलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं. मैत्रीचं नातं हे सर्वाँचं आवडीच नातं असतं कारण त्यामध्ये कोणतेही बंधन नसतं, कोणत्याही अटी नसतात. मैत्रीची अनेक रूपे असतात. काही वाईट असतात काही चांगले असतात काहींना आपल्या मनामध्ये जपून ठेवतो.

मैत्री या दोन अक्षरांमध्ये फार ताकद आहे मैत्री हा शब्दाच आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यास पुरेसा आहे. मैत्रीचं नातं इतकं अतूट असते की आयुष्यातील कोणतीही नाते शेवटपर्यंत टिकत नाहीत परंतु मैत्रीचं नातं असं नातं असतं जे अगदी शेवटपर्यंत सोबत राहत. मैत्रीचं नातं असं असावं की अगदी एकमेकांपासून लांब असलात तरी एकमेकांची आठवण काढल्याशिवाय दिवस जाणार नाही.

आयुष्यामध्ये एक चांगला मित्र किंवा मैत्रीण असण्यासाठी खूप नशीबवान असावं लागतं. मैत्रीमध्ये जसे दोन शब्द असतात तसेच दोन मनांना जोडणारी म्हणजे मैत्री. दोन व्यक्तींनी हृदयापासून जपलेलं नातं म्हणजे मैत्री. मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही माझी खात्री आणि तुला त्याची जाणीव असावी ही आपली मैत्री. 

पु. ल. देशपांडे यांनी मैत्री या विषयावर लिहिलेली ही कविता मैत्रीच्या गोड नात्याचं सुंदर वर्णन करते. खरा मित्र कोणाला म्हणावे? खरा मित्र तो असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातील प्रत्येक भाव लज्जा संकोच न वाटून घेता व्यक्त करतो. मैत्रीच गोड नात जर अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर आपण आपल्या खऱ्या मित्राशी कधीच खोटं नाही बोललं पाहिजे.

मैत्रीमध्ये एकमेकांचा आदर करणे देखिल तितकच गरजेचं असतं. एकमेकांच्या विचारांचा आदर करणं. मैत्री हे एक सुंदर नात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री सारखं सुंदर नातं असणे अतिशय गरजेचे आहे.

आम्ही दिलेल्या essay on friendship in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मैत्री वर निबंध मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi essay on my friend या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my best friend essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta mitra nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

essay on nature my friend in marathi

Marathi Salla

Essay on friends in marathi | 100, 200 आणि 500 ​​शब्दांमध्ये मित्रांवर निबंध.

December 6, 2023 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay on Friends in Marathi

Table of Contents

Essay on Friends in Marathi | 100, 200 आणि 500 ​​शब्दांमध्ये मित्रांवर निबंध | Essay on true friend in Marathi | खऱ्या मित्रावरील निबंध

Essay on Friends in Marathi

हे खरे आहे की “मित्र हे कुटुंब आहे ज्यांना आपण निवडतो”. जीवनात खरा मित्र खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या आयुष्यात कुटुंब असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मित्र असणंही महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक चांगला मित्र आपल्याला साथ देतो. मार्गात कितीही अडथळे आले तरी खरा मित्र आपल्याला नेहमी मदत करतो आणि मार्गदर्शन आणि आधार देतो. ज्याला खरा मित्र मिळाला त्याला जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती मिळाली. या ब्लॉगद्वारे मराठीत मित्रांवरील निबंध जाणून घ्या (Essay on Friends in Marathi)

Essay on friends in 100 words in Marathi | मराठीत १०० शब्दात मित्रांवर निबंध

मित्र हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. ते आपल्यासोबत सुख-दु:ख शेअर करतात. मैत्री हे एक नाते आहे जे समजून, विश्वास आणि समर्थन यावर आधारित आहे. मित्र आम्हाला प्रोत्साहन देतात, आपली स्वप्ने साकार करण्यास मदत करतात आणि अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहतात. चांगले मित्र आपले जीवन सुंदर आणि आनंदी बनवतात. त्यामुळे वेळोवेळी मित्रांसोबत वेळ घालवला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

त्यामुळे आपल्या जीवनात मित्रांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. असे म्हणतात की “जुना मित्र हा सर्वोत्तम आरसा असतो.” जुने मित्र तुम्हाला चांगले ओळखतात. मैत्रीची उणीव ज्यांना कधी जाणवली असेल तेच मित्राचे महत्त्व समजू शकतात. म्हणून, वेळोवेळी आपल्या मित्रांबद्दल प्रेम व्यक्त करत रहा.

आणखी माहिती वाचा : क्रिकेटचे मुख्य नियम | Cricket Rules in Marathi | all about Cricket in Marathi

Essay on friends in 200 words in Marathi | मराठीत 200 शब्दांत मित्रांवर निबंध

मैत्रीचे नाते सर्वात खास असते. चांगल्या मित्राचा सहवास लाभला तर आयुष्यातील सर्वात मोठे दुःख सोपे वाटते. मित्रांसोबत घालवलेला वेळ अमूल्य आहे. प्रत्येक चांगला मित्र आपल्या आयुष्यात नवीन रंग भरतो आणि आपल्याला सकारात्मक दिशेने प्रेरित करतो. आनंद द्विगुणित करतो आणि दु:ख हलके करतो. मैत्रीला खरे आणि विश्वासार्ह नाते म्हणून पूजले पाहिजे कारण ते जीवनातील सर्व अडचणींमध्ये आपली साथ देतात.

चांगले मित्र आपल्याला चांगले लोक बनवतात आणि आपल्याला सर्वोत्तम समर्थन देतात. ते आपल्या चुकांवर चेतावणी देतात आणि आपल्याला शिकण्याची संधी देतात.

मित्रांसोबतच्या नातेसंबंधांचे नूतनीकरण आणि दृढ करण्यासाठी, आपण वेळोवेळी त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. यामुळे आपले मैत्रीपूर्ण संबंध अधिक घट्ट होतात आणि आपण जीवनातील यश आणि आनंदाचा आनंद घेऊ शकतो.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण खऱ्या मित्रांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेची कदर केली पाहिजे. मैत्री ही समृद्धी आणि आनंदाचा स्त्रोत आहे ज्यामुळे आपले जीवन आनंदी होते.

आणखी माहिती वाचा : पॉडकास्ट म्हणजे काय? | What is podcast in Marathi? | मराठी सल्ला

Essay on friends in 500 words in Marathi | मराठीत 500 शब्दांत मित्रांवर निबंध

आयुष्यात चांगला मित्र मिळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. मैत्रीचं नातं मोलाचं असतं. एक चांगला मित्र आपल्याला प्रत्येक सुख-दु:खात साथ देतो. आमच्या कठीण प्रसंगी तो नेहमी आमच्या पाठीशी उभा असतो. एक चांगला मित्र आपल्याला कठीण परिस्थितीतून जाण्यास मदत करतो. जेव्हा आपण जीवनातील अडचणींमध्ये हरवून जातो तेव्हा तो आपल्याला मार्गदर्शन करतो. मैत्रीमध्ये विश्वास, समज आणि समर्थन महत्वाची भूमिका बजावतात. या निबंधात आपण मित्रांचे महत्त्व विस्तार मध्ये समजून घेऊ आणि त्यांच्यासोबत राहण्याचे फायदे पाहू.

मित्रांचे महत्त्व | The importance of friends

मित्र हे आपल्या जीवनात रंग भरणारे सोबती असतात. ते आपल्यासोबत सुख-दु:ख शेअर करतात आणि आपल्याला एकटेपणा जाणवू देत नाहीत. खरे मित्र आपल्यासाठी मौल्यवान असतात, कारण ते आपल्या हृदयात काय आहे ते समजून घेतात आणि आपण काहीही न बोलता आपल्याला मदत करतात. मैत्री हे विश्वास आणि समर्थनाचे एक अद्भुत बंधन आहे, जे आपल्याला कालांतराने अधिक मजबूत बनवते. खरा मित्र कधीही स्वतःच्या नफा-तोट्याकडे पाहत नाही. तो फक्त आपल्याला आधार देतो.

  • मित्रांसह जीवनाचा आनंद घ्या

मित्रांसोबत वेळ घालवणे हा एक चांगला अनुभव आहे. आपण प्रवास करणे, खेळणे, मनोरंजन करणे आणि वेळ घालवणे यासारख्या विविध क्रियाकलापांमध्ये एकत्र गुंततो. मित्रांसोबत हसण्यात, मस्करी करण्यात आणि मजा करण्यात विशेष आनंद मिळतो. ते आमचे ऐकतात आणि आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, मित्रांसोबत सण साजरे करणे आणि आनंद वाटणे हा देखील एक चांगला अनुभव आहे. मित्रांसोबत तासनतास घालवूनही काही मिनिटेच गेली आहेत असे वाटते.

मैत्रीचे योगदान | Contribution of friendship

आपल्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासात मैत्री महत्त्वाची भूमिका बजावते. मित्रांसोबत वेळ घालवल्याने आपण आनंदी आणि समाधानी आहोत. ते आपल्याला प्रोत्साहन देतात आणि आपली स्वप्ने साकार करण्यात मदत करतात. मित्रांसोबत चांगले संबंध ठेवल्याने आपले आरोग्यही चांगले राहते, कारण आपण हसत राहून मन शांत ठेवतो.

मैत्रीमध्ये विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो, जो आपल्या मनातील भावना समजून घेतो आणि आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करतो. मित्र तुम्हाला चांगले काळ साजरे करण्यात आणि वाईट काळात मदत करण्यास मदत करू शकतात. मित्र एकटेपणा आणि एकाकीपणाला प्रतिबंध करतात आणि आपल्याला आवश्यक असलेले समर्थन देखील प्रदान करतात.

एकूणच, चांगल्या मित्रांचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जर तुम्ही अशा लोकांशी मैत्री केलीत जे त्यांच्या वेळेत उदार असतात, इतरांना मदत करतात किंवा महत्वाकांक्षी किंवा कौटुंबिक- असतात, तर तुम्हाला ती मूल्ये स्वतः विकसित होण्याची अधिक शक्यता असते.

खर्‍या मित्रांमध्ये तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम आत्म्यामध्ये साचेबद्ध करण्याची ताकद असते. ते तुम्हाला पाहतात आणि तुम्ही खरोखर कोण आहात यासाठी ते तुमच्यावर प्रेम करतात. ते तुम्हाला प्रोत्साहन देतात आणि तुम्हाला अधिक चांगले काम करण्यासाठी आणि तुम्ही बनू इच्छित असलेली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करतात.

आणखी माहिती वाचा : SIP म्हणजे काय? | What is SIP in Marathi | मराठी सल्ला

Essay on true friend in Marathi | खऱ्या मित्रावरील निबंध

खऱ्या मित्रावरील निबंध | Essay on true friend in Marathi  खालीलप्रमाणे आहे –

जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टींपैकी एक म्हणजे खरे मित्र असणे. खरा मित्र तोच असतो जो सर्व ऋतूंमध्ये आपल्यासोबत असतो, जो ऐकतो आणि पाठिंबा देतो, जो एकनिष्ठ आणि विश्वासू असतो.

तुम्ही आनंदी असाल किंवा दुःखी असाल तरीही खरा मित्र तुमच्यासाठी नेहमीच असतो. ते तुमचा आनंद सामायिक करतात आणि तुमच्या दुःखात तुमचे सांत्वन करतात. चांगली बातमी असो किंवा वाईट असो ते तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच तयार असतात. ते तुमचे विचार आणि भावना समजून घेतात आणि तुम्हाला भावनिक आधार देतात.

खरा मित्र नेहमीच तुमच्याशी प्रामाणिक असतो, जरी सत्य कठीण असते. ते तुमच्याशी खोटे बोलत नाहीत किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलत नाहीत. ते तुमच्याबद्दल विचार करतात आणि तुम्हाला सर्वोत्तम सल्ला देतात. खरा मित्र तुमच्यासोबत एकनिष्ठ आणि विश्वासू असतो. ते तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करतात आणि नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतात. ते तुमच्याशी प्रामाणिक आहेत आणि तुमची काळजी घेतात.

खरा मित्र बनणे ही एक मोठी जबाबदारी आहे. खरा मित्र असणे म्हणजे अशी एखादी व्यक्ती असणे जी तुमच्यासाठी नेहमीच असेल, काहीही असो. खरा मित्र असणे म्हणजे तुमचे जीवन चांगले बनवणारी व्यक्ती असणे. खऱ्या मित्रांचे अनेक फायदे आहेत. ते आपल्या जीवनात आनंद, आधार आणि प्रेरणा आणतात. ते आम्हाला चांगले लोक बनण्यास मदत करतात. जर तुमचा खरा मित्र असेल तर त्याची कदर करा. ते एक मौल्यवान भेट आहेत.

मित्रावर 10 ओळी | 10 lines on a friend in Marathi

मित्रावरील 10 ओळी खालीलप्रमाणे आहेत –

  • जीवनात यशस्वी होण्याच्या मार्गावर खरे मित्र नेहमीच आपल्या सोबत असतात, जेव्हा आपण पडतो तेव्हा ते आपल्या सोबत उभे असतात.
  • मैत्री म्हणजे एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटून घेणे.
  • मित्र असा असतो जो आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारतो आणि आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही.
  • खरे मित्र हे आपले मौल्यवान रत्न आहेत, जे आपले जीवन उजळ करतात.
  • जीवनात कितीही संकटे आली तरी खरा मित्र नेहमीच तुमच्यासोबत असतो.
  • मित्रासाठी शब्दांना किंमत नसते.
  • मैत्री हे असे नाते आहे जे वेळेवर किंवा अंतराने विसरता येत नाही.
  • मैत्री हा एक भ्रम आहे, जो हृदयाच्या खोलात लपलेला असतो.
  • मैत्री म्हणजे जीवनाला स्वर्ग बनवणारा गोडवा.
  • खरे मित्र नेहमी एकमेकांच्या सुखाची पर्वा न करता हसतात आणि रडतात.

फ्रेंडशिप डे कधी असतो? | When is Friendship Day?

30 जुलै 2023 रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस आहे.

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2023 ची थीम काय आहे? | What is the theme of International Friendship Day 2023?

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2023 ची थीम आहे, ‘मैत्रीद्वारे मानवी भावना सामायिक करणे.

मित्राचे समानार्थी शब्द काय आहेत? |  What are synonyms for friend?

मित्राचे समानार्थी शब्द म्हणजे बंधू, यार, मित्र, परोपकारी, मित्र, भागीदार, मित्र, साथीदार, साथीदार, जिव्हाळ्याचा, मदतनीस, साथीदार आणि साथीदार.

मराठीत मित्रांवर निबंध हा आमचा ब्लॉग होता. अधिक समान निबंध ब्लॉग वाचण्यासाठी Marathi Salla शी संपर्कात रहा.

  • 10 lines on a friend in Marathi
  • 200 आणि 500 ​​शब्दांमध्ये मित्रांवर निबंध
  • Contribution of friendship
  • Essay on friends in 100 words in Marathi
  • Essay on friends in 200 words in Marathi
  • Essay on friends in 500 words in Marathi
  • Essay on Friends in Marathi
  • Essay on true friend in Marathi
  • The importance of friends
  • What are synonyms for friend?
  • What is the theme of International Friendship Day 2023?
  • When is Friendship Day?
  • आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2023 ची थीम काय आहे?
  • खऱ्या मित्रावरील निबंध
  • फ्रेंडशिप डे कधी असतो?
  • मराठीत १०० शब्दात मित्रांवर निबंध
  • मराठीत 200 शब्दांत मित्रांवर निबंध
  • मराठीत 500 शब्दांत मित्रांवर निबंध
  • मित्रांचे महत्त्व
  • मित्राचे समानार्थी शब्द काय आहेत?
  • मित्रावर 10 ओळी
  • मैत्रीचे योगदान

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi

my friend essay in marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majha Mitra Marathi Nibandh

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi

 वर्णनात्मक निबंध – माझा मित्र

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्याप्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल

  • माझा मित्र  निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi
  • मित्र निबंध मराठी /  mitra nibandh marathi
  • मित्रा वर मराठी निबंध / essay on friend in marathi

हे निबंध नक्की वाचा

  • मराठी विषयावरील निबंध संग्रह
  • असा रंगला सामना मराठी निबंध
  • आमची मुंबई मराठी निबंध 
  • भूक नसतीच तर मराठी निबंध
  • मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा  माझा मित्र मराठी निबंध  कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

essay on nature my friend in marathi

  • Tips & Guides

My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

  • by Pratiksha More
  • Mar 20, 2024 Mar 20, 2024

friendship day marathi essay

My Best Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध :.

ये दोस्ती हम नाही छोडेगे| तोडेगे दम मगर तेरा साथ ना छोडेगे |” पूर्वीच्या सिनेमामध्ये दोस्तीवर खूप गाणे असायचे आणि गोष्टी पण दोस्तीवर आधारलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला पण वाटायचे की आपली पण अशीच दोस्ती व्हावी कोणाबरोबर तरी.

तसे माझे खूप मित्र आहेत पण आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. त्यामुळे एक ग्रुप असा तयार झाला आहे. आम्ही सगळे एकटे किंवा एखादा भाऊ किंवा बहीण असलेले आहोत. आमची कॉलनी मध्ये सगळी न्यूक्लियर कुटुंबे आहेत. त्यामुळे आम्हाला एकत्र कुटुंबातील काहीच मजा माहीत नाही. आम्ही काहीतरी सनसनाटी घडावे अशी वाट बघत होतो. तेव्हड्यात त्याचे आमच्या शाळेत पदार्पण झाले. आम्हाला खुपच आनंद झाला .चला! आता ह्याची फिरकी घ्यायची. पण त्यानेच आमची तोंडे उघडीच राहतील असे पदार्पण केले.

मला अजून आठवतो आहे त्याचा आमच्या शाळेतील पहिला दिवस!कडक गणवेष, व्यवस्थित भांग पाडलेले केस नीट नेटके व्यवस्त्थित दफ्तर, पॉलिश केलेले बूट आणि ताठ बांधा. आम्ही सगळे जण त्याच्याकडे बघतच बसलो. शिक्षकांनी ओळख करून दिली, “हा अजिंक्य जोशी. आजपासून तो आपल्या शाळेत शिकणार आहे. हा कर्नल अमेय जोशींचा मुलगा आहे” आम्ही सगळेजण खूप खुश झालो.कारण अमेय जोशी आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत खेळात पुढे जायचे म्हणून आला. शिक्षकांनी त्याला माझ्या जवळच बसायला सांगितले. आमची ओळख झाली आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे जिवलग मित्र झालो.

आमच्यात काहीही कॉमन नाही. तरीही आम्ही जोडगोळी म्हणून ओळखले जाऊ लागलो. कदाचित विरुध्द्ध चुंबक एकमेकांना आकर्षित करतात हाच नियम इथेही लागू झाला असेल. तो उंच ,मी साधारण उंचीचा. तो सडपातळ मी गुटगुटीत. तो गोरा ,मी निमगोरा. तो व्यवस्थित ,मी गबाळा. आमचे एकमेकांशी तरीही छान पटते. कारण तो सांगतो आणि मी ऐकतो. त्याच्याकडून खूप शिकता येते. कारण तो खूप हुशार आहे. तो यायच्या आधी माझा पहिला नंबर होता. आता त्याचा आणि माझा विभागून पहिला नंबर येतो. तथापि त्याचे आणि माझे आवडते विषय वेगवेगळे आहेत. तो गणितात आणि इतिहास भूगोल तसेच संस्कृत मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवतो, आणि मला सायन्स आणि भाषांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना न येणारे विषय शिकवतो.

भविष्याची स्वप्ने :

आम्ही पुढे कोण होणार हयाबद्दल खूप चर्चा करतो आणि स्वप्न रंगवतो. त्याला त्याच्या वडिलांसारखेच आर्मीत जायचे आहे. म्हणून तो स्पर्धात्मक परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करीत आहे. माझेपण आयएएस बनण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे मी पण त्याच्या बरोबर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांचे कच्चे असलेले विषय सुधारायला मदत होते. आम्ही एकमेकांकडे जाऊन अभ्यास करतो. त्याच्याकडे त्याचे आई, बाबा आणि तो इतकीच माणसे आहेत. पण बाबा कर्नल असल्याने नोकर चाकर खूप आहेत. त्यांचे घर खूप मोठे आहे. आणि सरकारी इमारत असल्याने पूर्वीच्या ब्रिटिश अधिकार्यांचा बंगला असतो तसे आहे. मी पहिल्यांदा गेलो तर माझी छातीच दडपून गेली. आम्ही जारी फ्लॅटमध्ये राहत असलो तरी इतके मोठे घर पहिले नव्हते. पण त्याच्या बाबांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी एकदम प्रेमाने मला बोलविले आणि जवळ बसवून सगळी चौकशी केली. त्यांच्या दोघांच्या बोलण्यावरून मला जाणवले की ते किती सुसंस्कृत आहेत. म्हणूनच अजिंक्य इतका सुसंस्कृत वागतो. तरीही मी पाहीले, त्यांच्या घरात कडक शिस्त पण आहे. अगदी मिलिटरी खाक्या.

म्हणूनच अजिंक्य इतका वक्तशीर, व्यवस्थित आणि हुशार आहे. त्याच्याबरोबर राहून मी पण नकळत नीटनेटका आणि वक्तशीर व्हायला लागलो. आई तर चाटच पडली .माझ्यामध्ये असा बदल कसा झाला. मी तिला अजिंक्य बद्दल सांगितले. तर ती म्हणाली ,“ बघ,खरे मित्रा असे असतात जे तुमच्यामध्ये चांगला बदल घडवून आणतात. त्यासाठी त्यांना कडू बोलावे लागले तरी ते विचार करीत नाही. नाहीतर गोड बोलणारे भरपूर असतात ज्यांना तुझ्याकडून काहीतरी फायदा असतो अजिंक्य तुझा खरा मित्र आहे. त्याला सोडू नकोस” “ मी कुठे त्याला सोडणार आहे. उलट तोच चालला आहे NDA ला कमिशन ऑफिसर बनण्यासाठी “ मी म्हणालो. आईला त्याचे आणखी कौतुक वाटले. अश्याच एका प्रसंगाने आमच्या घरात तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला.

प्रसंगवधानी मित्र :

एकदा आम्ही रात्री परीक्षेचा अभ्यास करीत होतो तेंव्हा आईच्या अचानक पोटात दुखायला लागले. जवळ डॉक्टर नव्हते. बाबा पण घरी नव्हते. ती तळमळत होती. अजिंक्यने ताबडतोब त्यांच्या डॉक्टरना फोन केला आणि त्यांना गाडी घेऊन बोलविले. त्याने आणि मी आईला उचलले आणि दवाखान्यात नेले. त्याची पण आई आली, त्यामुळे मला धीर आला. आणि आईला बरे वाटले. मी विचारले “ तुला एव्हडे पटकन कसे सुचले” तर तो म्हणाला “ अरे,मिलिटरीत जायचे म्हणजे हीच तर परीक्षा असते. म्हणूनच आपले जवान सगळ्या जगात बेस्ट आहेत.”

इतका गंभीर आणि सुसंस्कृत असला तरी तो खोडकर आणि खेळकर पण आहे. तो उत्तम गातो, वॉयलिन वाजवतो, लेख लिहितो आणि नाटकात पण उत्तम काम करतो. देवाने त्याला इतके गुण दिले आहेत की वाटते, भगवान देता है तो छ्प्पर फाडके देता है. काहीच कमी नाही त्याच्यामध्ये, हा ,पण एक कमी आहे ती म्हणजे त्याला खोट अजिबात बोलता येत नाही. ह्याला कमी म्हणावे की सद्गुण. अर्थात मी त्याच्याकडून इतकं शिकलो, निदान त्याला एव्हडे तरी शिकविण्याचे माझे कर्तव्य नाही का? तुम्हाला काय वाटते?

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Marathi, Essay on Friendship in Marathi Wikipedia Language

Related posts, 7 thoughts on “my friend essay in marathi language : maza mitra nibandh, best friend”.

I love this essay very much to read I love it wow!!! The friend was cool I love it very much wow

I love my bff this is my real story like that only, जय माराठा

ekdaam kadaaaaaaaaaaaaaak

Your friend is fantastic…

Very nice Chan aahe

It is based on my real life

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

essay on nature my friend in marathi

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध

My Best Friend Essay in Marathi Language मित्र काय असतो, आता आपण माझा चांगला मित्र मराठी निबंध वर नजर टाकणार आहोत, चांगला मित्र हा वाक्प्रचार बोलणे तितके सोपे आहे कारण खरोखर एक चांगला मित्र शोधणे ही एक त्रासदायक प्रक्रिया आहे. एक चांगला चांगला मित्र तो आहे जो आपणास संकटात मदत करतो आणि आपल्याला योग्य स्टीयरिंग प्रदान करतो. आपल्या सवयीतील उणीवा दाखवतो.

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 100 शब्दांत

इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” खरोखर चांगला मित्र हा असा आहे जो इच्छित आणि आपत्तीच्या घटनांमध्ये काम करतो. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात एकटा राहू शकत नाही. त्याला विश्वासू चांगला मित्र हवा आहे की त्याने आपल्यासोबत भटकंती करावी, त्याचे सुख-दुख आणि त्याची कल्पना सामायिक करावी.

जेव्हा मनाने एकमेकांना सामोरे जाण्याची इच्छा असते तेव्हा परिचय मैत्रीत घसरण होते. भारतात कृष्णा-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची काही उत्तम उदाहरणे आहेत.

मी एक वास्तविक चांगला मित्र आहे. माझा अशोक नावाचा मित्र असून तो माझा वर्गमित्र आहे. आपण प्रत्येकजण योग्य असतो. अशोकचे वडील ट्रेनर आहेत आणि माझे वडील एका आर्थिक संस्थेत काम करतात. जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला.

अशोकची उंची 4.5. “” आहे. आम्ही सातव्या वर्गात आहोत. वर्गात शिकताना तो लक्ष केंद्रित करतो आणि शिक्षकांकडे लक्ष देतो. तो पॉकेटबुकमध्ये महत्वाची बाबी लिहितो. त्यांचे लिखाण खूपच सुंदर आहे. सर्व वेळेला चांगले गुण मिळतील एवढा तो जितका अभ्यासू आहे तो क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. त्याच्या सर्व सवयी चांगल्या आहेत.

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 200 शब्दांत

तो एक चांगला व्याख्याता आहे. कुठल्याही स्पर्धेत त्याला भाग घ्यायला आवडते.  तो सर्व वेळ हायस्कूलमध्ये वेळेवर येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात,त्याचे बूट नेहमी पोलिश असतात. त्यांचे दात मोत्यासारखे चमकतात. नखे कमी आहेत. आम्ही वर्गातल्या समान बेंचवर बसतो. आम्ही गणित, विज्ञान, प्रश्न एकत्रितपणे सोडवतो. मी इंग्रजी नीट बोलतो पण कधी कधी त्याची मदत मला घ्यावी लागते. या पद्धतीने आम्ही एकमेकांना सहकार्य करून चांगले गुण मिळवतो.

शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो माझ्याबरोबर आहे. संध्याकाळी आम्ही एकत्रितपणे खेळतो. साधारणपणे एकमेकांच्या घरी नेहमी  जातो. माझे वडील आजारी असताना तो दररोज रात्री दवाखान्यात यायचा.

मी माझ्या चांगल्या मित्रासोबत आनंदी आहे. माझा विश्वास आहे की आमची मैत्री नेहमीच अशीच राहील. मला खात्री आहे की आमची मैत्री कधीच संपणार नाही.

My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 300 शब्दांत

अशोकसारखा चांगला मित्र मिळाला मी खूप भाग्यवान आहे.  तो नेहमी खेळांच्या उपक्रमांबद्दल बोलत असतो. तो एक चांगला आहे.  तो सर्व खेळांच्या क्रियाकलापांमध्ये उत्सुक आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक खेळाविषयी तांत्रिक माहिती आहे. अन्य कोणत्याही बाबतीत, जे लोक नियमितपणे क्रिकेटमध्ये भाग घेत आहेत त्यांना क्रिकेटच्या पीच आकार, लांबी आणि रुंदी माहित आहे?

अशोक केवळ व्हिडिओ गेमबद्दल तपशील गोळा करत नाही तर तो सर्व व्हिडिओ गेम योग्यप्रकारे खेळतो सुद्धा. त्याच्याकडे क्रिडा जगत पुस्तकांचे मोठे संचय आहेत. तो प्रत्येक वर्तमानपत्रातील क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती वाचतो. हवे तसे कात्रण काढतो.

अशोकच्या वडिलांनी आणि आईने छंदांना कधीही विरोध केला नाही. अगदी त्यांनी अशोकला प्रोत्साहितच केले.  त्याचे वडील त्याला क्रीडा क्रियाकलापांची मासिके घेऊन येतात. म्हणून अशोक आपल्या छंदांची चांगली काळजी घेऊन आपले संशोधन चांगले ठेवतो. म्हणून माझा हा चांगला मित्र घरी, शाळेमध्ये आणि सर्व मित्रांमध्ये एक विशिष्ट आवडता मित्र आहे.

मित्रांनो, My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध या निबंधाबद्दल आपल्याला कसे वाटले? आम्हाला comment करून नक्की सांगा. धन्यवाद! तुम्हाला हिंदी भाषेत निबंध वाचायचे असतील तर आमच्या in hindi essay ब्लॉगला जरूर भेट द्या.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

' src=

Affiliate program

Refer our service to your friend and receive 10% from every order

Home

Article Sample

  • bee movie script
  • hills like white elephants
  • rosewood movie
  • albert bandura
  • young goodman brown

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “   घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

या वातावरणामध्ये आपले जीवन सुखी समाधानाने जगत आहोत त्याला निसर्ग असे म्हणू शकतो. निसर्ग ही देवाने दिलेली खूप सुंदर देणगी आहे.कदाचित याच निसर्गामुळे सजीव सृष्टी या पृथ्वीतलावर निर्माण झाली असावी. जीवन आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला निसर्गातूनच होतो.

आजच्या आधुनिक जगाने केलेली प्रगती ही अविस्मरणीय आहे. बऱ्याचशा नवनवीन गोष्टींचा शोध हा मानवाने लावलेला आहे. परंतु, जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो. आपल्या सभोवताली आढळणारे पाणी, हवा, आकाश,डोंगर-दर्या ही निसर्गाची तत्वे आहेत.

निसर्गाचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. जसे की नद्या ,समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य या वस्तू आपल्याला दिसतात परंतु याच निसर्गामध्ये काही अशा अदृश्य वस्तू आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत परंतु या सर्वांचा मिळून निसर्ग बनलेला असतो.

पृथ्वी वर्तुळाकार दिशेमध्ये स्वतः भोवती होते सूर्याभोवती फिरते यामुळेच दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी ग्रहावर एक जीवनदायी वातावरण आहे त्यामुळे खूप सारे घटक पृथ्वीमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

पृथ्वीवर असलेल्या घटकांमधील पाणी आणि हवा हे त्याचे मुख्य जीवनदायी घटक म्हणता येईल. आणि या घटकांची उपलब्धता ही निसर्गाच्या नियमांवर होत असाते. या पृथ्वीवर असलेले सर्व सजीव घटक एकमेकांशी निसर्गाच्या माध्यमातून जोडलेले असतात. पृथ्वीवरील सजीवांचे जीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

अन्न, पाणी, हवा यांसारख्या मूलभूत कारण गरजा पूर्ण करण्याची काम निसर्गातूनच होते. या व्यतिरिक्त अग्नी आणि आकाश ही तत्वे सुद्धा निसर्गातून आपल्याला मिळत आसले तरी आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

एकत्र जीवन आणि निसर्ग समजून घेणे खूप कठीण आहे तरी आपण आपल्या सभोवतालचे वातावरण म्हणजे निसर्ग असे समजतो. आणि आणि निसर्गाद्वारे आपले जीवन गतिमान आहे. मानवा पूर्णता निसर्गाचे जोडलेला आहे. निसर्गात वेगवेगळे ऋतू असतात. आणि या ऋतूनुसार आपल्या शेजारील वातावरण आणि हवामान सतत बदलत असते.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतू नुसार होणारे बदल हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. तसेच पाण्याची गरज आणि हवा शुद्धीकरण यासाठी निसर्गचक्र आहे ज्याद्वारे पृथ्वीवर फिरून फिरून पाऊस असतो तसेच वातावरणात असलेल्या हवेचे थर ज्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी हवा आपण श्वास म्हणून घेतो.

या निसर्गात असलेले झाडे, नद्या, नाले, समुद्र यांपासून आपली हवेची आणि पाण्याची गरज पूर्ण झाली. अग्नि ची गरज हे नंतर निर्माण झाली. याच अग्नि मुळे आपण अन्न कच्चे न खाता शिजवून खाऊ लागला.

अन्न निर्मितीसाठी आपण शेती व झाडां पासून मिळणाऱ्या फळांचा वापर करू लागलो परंतु ही झाडे किंवा शेती हा एक निसर्गाचाच भाग आहे.

निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे झाडे आहेत. याच झाडापासून मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच “ऑक्सिजन” मिळतो. तसेच पृथ्वी वर झाडे आहेत म्हणून बहुतांश पाऊस हा झाडा मुळे होतो. आणि अन्नाची गरज सुद्धा झाडांमुळेच सांगते. त्यामुळे झाडे ही निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.

माणसाचा जन्म आणि मृत्यू हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. किंबहुना मनुष्य सुद्धा याच निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. या सृष्टी वर आसलेले प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, नद्या-नाले, डोंगर सर्व काही निसर्गाचीच देणगी आहे. हा निसर्गातूनच मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून माणसाने आज प्रगती केलेली आहे.

निसर्गाचे झाडांच्या लाकडांचा वापर करून इमारती बांधल्या जाऊ लागल्या, तसेच झाडाच्या लाकडापासून विविध फर्निचरच्या वस्तू बनवण्यात जात आहेत. निसर्गातील औषधी वनस्पतींपासून माणूस औषधे निर्माण करून आपले आयुष्य वाढवू लागला. त्यामुळे मृत्यूदर कमी होऊन जीवन काळ वाढू लागला आहे. वयाचा परिणाम लोकसंख्या वाढ झालेली जाणवत आहे.

तसेच निसर्गातून मिळणाऱ्या अनेक वस्तू म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, खाण कामातून मिळणाऱ्या मौल्यवान वस्तू यांचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करू लागला.

अशाप्रकारे मनुष्य स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला नुकसान पोहोचत आहे. आजचा मनुष्य विसरून चालला आहे की आपले घरी आपली असते परंतु या संपूर्ण सृष्टी चे घर म्हणजे निसर्ग आहे.

मानवाने निसर्गात अनेक महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर आपले उद्योगधंदे उभारले आहेत. निसर्गातील झाडांपासून रबर निर्मिती, औषधी निर्मिती, फर्निचर निर्मिती, इंधन म्हणून वापर, समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवेवर चालणाऱ्या पवनचक्क्या, खान कामातून कोळसा, खनिज निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण उद्योग माणसाने निसर्गातून मिळणाऱ्या कच्चा मालाच्या आधारावर स्थापित केलेले आहेत.

मासेमारी, पशुधन, पशूपालन, शेती, माती पासून विटा निर्मिती या गोष्टीसुद्धा निसर्गातील घटकांवर अवलंबून आहेत.

निसर्गात असलेली सुंदर दृश्य माणसाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्य यामुळे जगभरातील पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन आर्थिक मदत होत आहे. भारतातील महाबळेश्वर, केरळ, कोकण, काश्मीर यांसारख्या निसर्गाने परिपूर्ण असलेल्या शहरांचा लाभ घेण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.

जगभरात असलेल्या अनेक निसर्गनिर्मित आचार्यांना पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करून निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत आहे. त्यातून त्या देशाच्या आर्थिक विकासाला सुद्धा मदत होत आहे. निसर्गातील हिरवळ, रंगीबिरंगी फुले, फळे, पक्षी, प्राणी, वेली, यांना बघितल्यास मानवाचा मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते. अशाप्रकारे निसर्ग मनुष्याला चारी बाजूंनी मदत करण्यास उपयोगी पडतो.

अलीकडे वाढलेल्या आधुनिक कारणामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वृक्षतोड, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण हे सर्व निसर्गाला झालेल्या हनीतून होणारे परिणाम आहेत. मानवाने स्वतःच्या सुखासाठी, सोयीसाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला हानी पोहोचली आहे त्यामुळे निसर्गातील इतर जीव म्हणजेच प्राणी, पक्षी यांची जीवन संकटात आले आहे.

परंतु मानवाने निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्ग आपला मित्र आहे, निसर्गामुळे आपली जीवन सुरळीत चालले आहे हे लक्षात घेऊन निसर्गाचे संरक्षण करणे याकडे लक्ष दिले पाहिजे.

मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पुरती ही निसर्गातूनच होते. जर निसर्गाला नुकसान पोहोचले किंवा हानी पोहोचली तर याचे परिणाम हे आपल्यालाच सोसावे लागतील. आपण निसर्गाला नष्ट केले तर निसर्ग आपल्याला नष्ट करू शकतो.

त्यामुळे आपले जीवन सुखकर आणि निरोगी ठेवण्यासाठी व पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. वातावरणात वाढ आलेले  प्रदूषण, वृक्षतोड यांच्या प्रमाण कमी केले असता कदाचित निसर्गमुळे  होणाऱ्या हानी पासून आपण वाचू शकतो.

प्रत्येकाने निसर्ग हा आपला मित्र आहे असे समजून निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य समजले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्गातील गोष्टींचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर आज आपण निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे.

कुठलाही मोबदला न घेता निसर्ग आपल्याला विविध गोष्टी पुरवितो. याची जाणीव ठेवून आपण निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवली पाहिजे.

खरंच ! निसर्ग आहे म्हणून या पृथ्वीतलावर संपूर्ण सजीव आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळालेचं असेल.

तर मित्रांनो ! ” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले  असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

ये देखील अवश्य वाचा :-

  • मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
  • 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
  • माझा आवडता सण मराठी निबंध
  • मी इंजिनियर होणार निबंध मराठी
  • सायकलची आत्मकथा मराठी निबंध 

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi”

Nice post Thanks

Thanks For This Essay.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Customer Reviews

essay on nature my friend in marathi

Finished Papers

Adam Dobrinich

' src=

Niamh Chamberlain

essay on nature my friend in marathi

Diane M. Omalley

  • Exploratory

essay on nature my friend in marathi

Andre Cardoso

Need an essay writer for me? Connect now!

Feeling tired to write drafts on your own or you do not have ample ideas to write with? Be it anything, our writers are here to assist you with the best essay writing service. With our service, you will save a lot of time and get recognition for the academic assignments you are given to write. This will give you ample time to relax as well. Let our experts write for you. With their years of experience in this domain and the knowledge from higher levels of education, the experts can do brilliant essay writing even with strict deadlines. They will get you remarkable remarks on the standard of the academic draft that you will write with us.

Jam Operasional (09.00-17.00)

+62 813-1717-0136 (Corporate)                                      +62 812-4458-4482 (Recruitment)

receive 15% off

What is the native language of the person who will write my essay for me?

  • Our process

Finished Papers

essay on nature my friend in marathi

"Essay - The Challenges of Black Students..."

COMMENTS

  1. Nature Is My Friend Essay Marathi

    निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi. निसर्ग कशाला म्हणतात : निसर्गातून मिळणाऱ्या वस्तू : मानव आणि निसर्गाचा नातं ...

  2. निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi

    तर हा होता निसर्गाचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास निसर्गाचे महत्व मराठी निबंध हा लेख (essay on nature in Marathi) आवडला असेल.

  3. माझा मित्र वर मराठी निबंध Essay On My Friend In Marathi

    Essay On My Friend In Marathi माझा सर्वात चांगला मित्र हा माझ्या आयुष्यातील आनंद, सांत्वन आणि सामायिक अनुभवांचा स्रोत आहे. या निबंधात आमची मैत्री, आमची जोडणी,

  4. निसर्ग मराठी निबंध 2024 अतिशय सुंदर Essay on Nature in Marathi

    Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi. मानव निसर्गाची हानी करून स्वत:च्या पायावर स्वत:च कुर्‍हाड मारून घेऊ लागला आहे, तो हे विसरून चालला आहे की जसे आपले घर आपले घर आहे ...

  5. निसर्ग माझा मित्र / सोबती मराठी निबंध

    तर मित्रांनो हा होता nature is our friend essay in marathi अर्थात निसर्ग आपला सोबती या विषयावरील मराठी निबंध. आशा करतो की निबंध तुम्हाला आवडला असेल या ...

  6. [2023] Nature essay in Marathi

    Nature essay in marathi (निसर्ग मराठी निबंध) निसर्ग हा मानवजातीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. मानवी जीवनासाठी हा एक महान आशीर्वाद आहे ...

  7. Essay on nature my friend in marathi

    Essay on nature my friend in marathi. निसर्ग माझा मित्र. अनेक कवींनी व लेखकांनी निसर्गाचे वर्णन आपल्या कविता आणि लेखां मधून केले आहेत. पण निसर्ग म्हणजे ...

  8. Essay On Tree Our Best Friend In Marathi

    August 29, 2021 by Marathi Mitra. वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | Essay On Tree Our Best Friend In Marathi. अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रहांन पैकी पृथ्वी चा आसा ग्रह आहे जेथे ...

  9. माझा मित्र निबंध मराठी

    माझा मित्र निबंध मराठी Set 1 - My Best Friend Essay in Marathi Set 1. माझा मित्र निबंध मराठी Set 2 - My Best Friend Essay in Marathi Set 2. माझा आवडता मित्र Set 3 - My Friend Essay in Marathi Set 3. माझा आवडता ...

  10. मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

    Essay on Friendship in Marathi - My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं

  11. माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay On My Favourite Friend In Marathi

    माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay on My Favourite Friend in Marathi (200 शब्दात). मैत्री हा एक मौल्यवान दुवा आहे जो आपले जीवन सुधारतो आणि वैभव हा माझ्या विश्वातील एका अद्भुत ...

  12. निसर्ग वर मराठी निबंध Essay On Nature In Marathi

    Essay On Nature In Marathi आपण सर्वात सुंदर ग्रहावर राहतो, पृथ्वी ज्याचा निसर्ग अतिशय स्वच्छ आणि आकर्षक हिरवागार आहे. निसर्ग हा आपला सर्वोत्तम मित्र आहे जो

  13. Essay on Friends in Marathi

    Essay on friends in 100 words in Marathi | मराठीत १०० शब्दात मित्रांवर निबंध. मित्र हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. ते आपल्यासोबत सुख-दु:ख शेअर ...

  14. माझा मित्र निबंध मराठी

    वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल. माझा मित्र निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi. मित्र निबंध मराठी / mitra nibandh marathi. मित्रा वर मराठी निबंध / essay on ...

  15. My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

    My School Essay in Marathi | माझी शाळा Mazi, Majhi Shala Nibandh. Water Pollution Information in Marathi Essay | Jal Pradushan in Marathi ... Aai Sampavar Geli Tar, Essay on Mother for Class 6, 7, 8th Nibandh. 7 thoughts on "My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend" ...

  16. My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध

    My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 100 शब्दांत. इंग्रजीत एक म्हण आहे - "A friend in need is a friend indeed.". खरोखर चांगला मित्र हा असा आहे जो इच्छित ...

  17. my best friend essay in Marathi

    इंग्रजीत एक म्हण आहे - "A friend in need is a friend indeed.". गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो ...

  18. Essays on Nature My Best Friend In Marathi

    My Best Friend I have lots of friends. Expecting these, there are a few friends who are my best friends. Now I would like to write about one of my best friend whose name is Zhenis... 291 Words; 2 Pages; My Best Friend My Best Friend Freedom, passion, trust, faith, love, hope, courage, strength, but most of all fight.

  19. Essay On Nature My Friend In Marathi

    Essay On Nature My Friend In Marathi (415) 397-1966. Gain recognition with the help of my essay writer. Generally, our writers, who will write my essay for me, have the responsibility to show their determination in writing the essay for you, but there is more they can do. They can ease your admission process for higher education and write ...

  20. Essay On Nature in Marathi

    " निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi " वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

  21. Essay On Nature My Friend In Marathi

    Our writers will help with any kind of subject after receiving the requirements. One of the tasks we can take care of is research papers. They can take days if not weeks to complete. If you don't have the time for endless reading then contact our essay writing help online service. With EssayService stress-free academic success is a hand away.

  22. Essay On Nature My Friend In Marathi

    Essay On Nature My Friend In Marathi - ID 4746278. Finished paper. ... Gain recognition with the help of my essay writer. Generally, our writers, who will write my essay for me, have the responsibility to show their determination in writing the essay for you, but there is more they can do. They can ease your admission process for higher ...

  23. Essay On Nature My Friend In Marathi

    Essay On Nature My Friend In Marathi | Top Writers. Estelle Gallagher. #6 in Global Rating. We Make It Better. Emery Evans. #28 in Global Rating. For Sale. ,485,000. As we have previously mentioned, we value our writers' time and hard work and therefore require our clients to put some funds on their account balance.